दिवेलागणी....
दूर क्षितीजावर जेव्हा, सूर्य मावळत असतो;
तुझ्या आठवणींचा समुद्र, मनात माझ्या उसळत असतो.
डोळ्यांत अश्रु साचतात, मन माझं भरून येतं;
ह्रदयाची स्पंदनं वाढतात, माझं भावनाविश्व दाटून जातं.
अश्रुच्या प्रत्येक थेंबात, माझं प्रेम साचलेलं असतं;
त्या हळव्या क्षणी, मन माझं थिजलेलं असतं.
काळजाचा ठोका चुकतो, त्या कातरवेळी;
भावनांच्या मर्यादा तुटतात, त्या संध्याकाळी.
तुझ्या आठवणींचे समुद्रपक्षी, घरट्याकडे परतू लागतात;
काळोख्या त्या रात्री, तुझी स्वप्नं मात्र जागतात.
देऊन जातेस मला, तू तेच जुनं आभाळ पुन्हा;
अन मी पण वेड्यासारखं, तुझंच चित्र काढत बसतो पुन्हा पुन्हा....
----------------------------------------------------------------------------------------------
कविता मी लिहीलेली नाहि पण माझ्या "मना"ला भाउन गेली.
Friday, December 4, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment